वडीगोद्री प्रतिनिधी :– गोदावरी नदीचे पाणी आटल्याने हजारो मासे मृत अवस्थेत सापडले आहेत. ही घटना केवळ मासांपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतील, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
पाण्याचा अभाव आणि तापमान वाढ
वाढत्या तापमानामुळे नदीचे पाणी झपाट्याने आटत आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने ऑक्सिजनची पातळी घसरली आणि परिणामी मासांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला. हे चित्र पाहून पर्यावरणाचे आणि मानवी हस्तक्षेपाचे दुष्परिणाम स्पष्ट दिसून येतात.
दुषित वातावरण आणि आरोग्याचा धोका
मृत मासांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, त्यामुळे परिसरात दुषित वातावरण तयार झाले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. परिसरात दुर्गन्धी पसरली आहे..त्यामुळे गोदवारी पात्रात लवकर पाणी सोडावे..अशी मागणी होत आहे..
प्रशासन आणि नागरिकांचे उत्तरदायित्व
गोदावरीसारख्या महत्त्वाच्या नदीचे संवर्धन करणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. जलसंधारण, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारल्यासच अशी संकटे निर्माण होईल..
Leave a Reply